धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.…

दिनांक 16/02/026 रोजी हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर तसेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रकल्प होप आयोजित मैत्री मनाशी अभियान 2026….मानसिक आरोग्य वाढीस लागावे म्हणून 1 मे 2025 पासून हा प्रकल्प 28 गावामध्ये काम करत आहे . शारीरिक आरोग्य याबरोबर मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचे असून दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकालाच वेगवेगळ्या कारणास्तव तान तनाव चिंता आणि नैराश्य येत असते वेगवेगळ्या कारणास्तव लोक आत्महत्याचा विचार करतात. टोकाचे पाऊल उचलतात हा काही पर्याय नसून आपल्या मनातील दुःख आलेली समस्या यावर मात करण्यासाठी समुपदेशन घेणे तसेच मानसोपचार तज्ञ यांना भेटणे महिन्यातून तीन रविवार अणदूर येते मानसोपचार तज्ञ येतात त्यांनाही लोकांना भेटावे या ठिकाणी तपासणी फीस निशुल्क असून गरजेनुसार गोळ्या औषध लागले तर यामध्ये 50% बोलत आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हाच होता की जास्त प्रमाणात लोकांनी मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे यावरती dr. देशपांडे मॅडम यांनी माहिती दिली. या अभियानाचे उद्घाटन सलगर (म) येते दिनांक 8 फेब्रुवारी रोजी झाले होते.. समारोप दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी चिंचोली येथे करण्यात आला. यावेळी हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थाप्रमुख dr. शुभांगी अहंकारी मॅडम यांचे प्रमुख उपस्थिती होती, dr. संजोत देशपांडे ( पुणे) यांनी मानसिक आरोग्य आजार यावरती मार्गदर्शन केले. उपसरपंच किरण पाटील नावडे सर, प्रक्लप समन्वयक मेधा काळे मॅडम , वासंती मुळे, नागिनी सुरवसे , प्रकल्पाचे सतीश चव्हाण यांचे कडे सुपरवायझर म्हणून 11गावे आहेत. योगेश सोनवणे, ज्योती बिराजदार, चिंचोली गावातील मन मित्र सुषमा कदम , अशा कार्यकर्ते – कल्पना कदम झेपसखी – फतीमा पठाण ,अंगणवाडी कार्यकर्ते – समिना सय्यद , सीआरपी- शेशाबाई देडे ,तसेच 28 गावातून आलेले सर्व मन मित्र तसेच गावातील महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदे मातरमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची दिमाखदार सांगता

धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती धाराशिवमध्ये जल्लोषात ; दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पणाने अभिवादन

धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व प्रेरणादायी राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती आज धाराशिव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. धाराशिव…

‘माय भारत (मेरा युवा भारत)’ मेगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शिवजयंतीनिमित्त ३ हजारांचा सहभाग

धाराशिव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, कर्तृत्व व राष्ट्राभिमान जागविणाऱ्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘My Bharat (Mera Yuva Bharat)’ मेगा पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने…

पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित

धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) – विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी व योगदान देणाऱ्या उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार २०२६ ने दैनिक यशवंतचे जिल्हा प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन…

पोवाड्यांतून शिवचरित्राचा जयघोष ; धाराशिव येथे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक सोहळा उत्साहात

धाराशिव –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध…

आयुक्त किरण जाधव यांची ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला भेट;

तृतीयपंथीय सक्षमीकरणाचा उपक्रम ठरतोय यशस्वी धाराशिव – लोकसेवा हक्क आयोगचे आयुक्त किरण जाधव यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.यावेळी…

शिवजयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारीला धाराशिव येथे सांस्कृतिक सोहळा

धाराशिव –  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श,स्वराज्य संकल्पना,…

घरपोच लोकसेवा हेच ध्येय,आयुक्त श्री.किरण जाधव ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक

धाराशिव – सर्वसामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सेवा वेळेत व घरपोच पद्धतीने उपलब्ध करून देणे हा लोकसेवा हक्क आयोगाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रतिपादन लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव यांनी केले. आयुक्त…