जागतिक पर्यावरण दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचा संदेश

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी ) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने आज ५ जून,२०२६ रोजी न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसर,धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.याच परंपरेला अनुसरून या वर्षीही भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून विविध झाडे लावण्यात आली.तसेच उपस्थितांना व नागरिकांना मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाची गरज याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या हस्ते रोपटे लावून करण्यात आली.या प्रसंगी ए.एस.आवटे,जिल्हा न्यायाधीश आर.के.खोमणे,जिल्हा न्यायाधीश,एन.एल.येवलेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद,विश्वास करे, विभागीय वन अधिकारी,धाराशिव, भाग्यश्री पाटील,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,दिपक गांधले,वन परीक्षेत्र अधिकारी,धाराशिव, पी.व्ही.मेढे,मुख्य न्यायदंडाधिकारी,उस्मानाबाद, एस.एस.पाटील,सहदिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,तसेच एस.एस. पाटील,७ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,उस्मानाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील कर्मचारी,विद्युत आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

  • Related Posts

    धाराशिवच्या ऐतिहासिक गडांना नवे जीवन : नळदुर्ग आणि परांडा किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी कोट्यवधींची योजना

    Spread the love

    Spread the loveजिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे एक ऐतिहासिक स्थान असून,येथे असलेला नळदुर्ग किल्ला हा प्रमुख आकर्षण आहे.हा किल्ला प्राचीन काळातील महत्त्वाचा किल्ला मानला जातो.किल्ल्याची मूळ उभारणी कल्याणीच्या चालुक्य काळात…

    धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *