

धाराशिव : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती करण्यात आली तर समाज कल्याण विभाग व धाराशिव सेवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी संप्रदाय दिंडीचे स्वागत करण्यात आले.यावेळी वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच “जिथे जाचाल तिथे वाचाल ” भारतीय संविधान” या संदेशाद्वारे संविधान जनजागृती करण्यात आली.मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला संविधान जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आले होते

समाज कल्याण विभागाच्या वतीनेही वारकरी दिंडीत संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली.भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासत वारकरी संप्रदाय दिंडी यातुन मानवतेचा संदेश देण्यात येतो असे मनोगत व्यक्त करत भारतीय संविधान हे जगातील एकमेव सर्व श्रेष्ठ संविधान असुन आपणाला न्याय व जगायला शिकविते असे मनोगत सहा आयुक्त सचिन कवले यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाची रुपरेषा गणेश वाघमारे यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकारी मॅडम, दिव्यांग महामंडळाचे अधिकारी सच्चिदानंद बांगर,मतदार जनजागरण समितीचे गणेश रानबा वाघमारे,धाराशिव सेवक फाऊंडेशनचे विवेक यादव, विजय राठोड,दिनेश देवकते, प्रकाश चव्हाण,अतुल जगताप, श्री. गुरव,संकेत जगताप तसेच शहर वाहतूक (ट्रॅफिक) पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.