
धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळा येथुन व्यसनमुक्ती,नशा मुक्त भारत जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली,या रॅलीची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन करण्यात आली,जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान या सदराखाली मतदार जनजागरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडाळकर व सहाय्यक कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांना भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत देऊन मतदार जनजागरण समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाविषयी माहिती गणेश वाघमारे यांनी दिली.यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे आयुक्त सचिन कवले,विस्तार अधिकारी भारत देवगुडे,व्यसनमुक्ती चळवळीचे डॉ.संदिप तांबारे,तसेच मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ,कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग,आनंद वीर सर,राजेंद्र धावारे सर,समाज कल्याणचे कपील थोरात,श्री गुरव, संकेत भोसले,प्रविण कातंगले,रजियोद्दीन काझी,सहभागी झालेल्या शाळाचे मुख्याध्यापक,शिक्षक,सह इतर मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते
