व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

Spread the love

तुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.

वाहनाच्या रांगा पंपापासून ते समाधान हॉटेल पर्यंत जात असून यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

वाहनाच्या रांगा ह्या समाधान ढाब्या पर्यंत जात असून सोलापूर ते धुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची वाहन जात असतात या रांगा तील वाहनांना अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

अपघात झाल्यानंतर कोणी मयत झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे व्यवस्थापन हे चुकीचं नियोजन करत असल्यामुळे वाहडाच्या रांगा लागत असून यामध्ये निष्पाप भाविकांचा बळी देखील जाऊ शकतो.

शासनाने घालून दिलेल्या नियमांची येथे पायमली होत असून जे गॅस भरणारे कर्मचारी आहेत त्यांना कुठलेही संरक्षण कवच ना किंवा सुरक्षितेची काळजी येथे घेतली जात नाही भविष्यात जर एखादा अपघात घडला तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते. शासनाने घालून दिलेले नियमाचे पालन होणे आवश्यक असताना देखील व्यवस्थापन मात्र या नियमाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहेत. याचा फटका वाहनधारकाला बसण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या 10 जणांवर दंडात्मक कारवाई

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरात थुंकताना आढळलेल्या १० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. श्री…

    जागतिक पर्यावरण दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचा संदेश

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने आज ५ जून,२०२६ रोजी न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसर,धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *