
तुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
वाहनाच्या रांगा पंपापासून ते समाधान हॉटेल पर्यंत जात असून यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

वाहनाच्या रांगा ह्या समाधान ढाब्या पर्यंत जात असून सोलापूर ते धुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मालवाहतुकीची वाहन जात असतात या रांगा तील वाहनांना अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
अपघात झाल्यानंतर कोणी मयत झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे व्यवस्थापन हे चुकीचं नियोजन करत असल्यामुळे वाहडाच्या रांगा लागत असून यामध्ये निष्पाप भाविकांचा बळी देखील जाऊ शकतो.

शासनाने घालून दिलेल्या नियमांची येथे पायमली होत असून जे गॅस भरणारे कर्मचारी आहेत त्यांना कुठलेही संरक्षण कवच ना किंवा सुरक्षितेची काळजी येथे घेतली जात नाही भविष्यात जर एखादा अपघात घडला तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होऊ शकते. शासनाने घालून दिलेले नियमाचे पालन होणे आवश्यक असताना देखील व्यवस्थापन मात्र या नियमाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहेत. याचा फटका वाहनधारकाला बसण्याची शक्यता आहे.