पालकमंत्र्यांना शेतकरी पुत्राची भावनिक साद!

Spread the love

स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन मेडसिंगा येथेच करा; मनोज जाधव यांचे प्रताप सरनाईक यांना सोशल मीडियातून अनोखे निमंत्रण

रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखा उपक्रम; पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

धाराशिव | प्रतिनिधी…

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मेडसिंगा येथील शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक साद घालत एक अनोखे निमंत्रण दिले आहे. यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा मुख्य झेंडावंदन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी मेडसिंगा गावात आयोजित करून आपल्या हस्ते ध्वजारोहण करावे, अशी त्यांनी विनंती केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धाराशिव शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेले मेडसिंगा गाव तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात येते. मात्र, गावातील प्रमुख रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मनोज जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त शिक्षक वसंत पाटील आणि ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित लोकप्रतिनिधींकडे रस्त्याच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा केला. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोपही या पोस्टमधून करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मेडसिंगा येथे येऊन ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहावे, गावातील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जिल्हा विकास आराखड्यातून रस्त्याच्या नव्याने बांधकामासाठी निधी मंजूर करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी भावनिक विनंती करण्यात आली आहे.

मनोज जाधव यांच्या या आवाहनामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री या अनोख्या निमंत्रणाचा स्वीकार करून मेडसिंगा येथे ध्वजारोहण करतील का? गावाच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतील का? याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

धाराशिव जिल्ह्यात एखाद्या सर्वसामान्य गावातून पालकमंत्र्यांना अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाचे सार्वजनिक निमंत्रण देण्याची ही कदाचित पहिलीच घटना असल्याने या विषयाची सर्वत्र चर्चा रंगली असून, येत्या स्वातंत्र्य दिनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


ठळक मुद्दे :

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना सोशल मीडियावरून भावनिक निमंत्रण.

१५ ऑगस्टचे झेंडावंदन मेडसिंगा येथे करण्याची मागणी.

गावातील रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयत्न.

पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल.

पालकमंत्री काय निर्णय घेणार? जिल्ह्याचे लक्ष आता १५ ऑगस्टकडे.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *