शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

Spread the love

धाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) आणि बावी येथील आपले सरकार सेवा केंद्रांना भेट देऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांच्यासमवेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पांडुरंग साठे तसेच धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव उपस्थित होत्या.

अधिकाऱ्यांनी केंद्रावरील आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली,कामकाजाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना कोणताही मनस्ताप होणार नाही, प्रक्रिया सुरळीत,पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण व्हावी, यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आधार प्रमाणीकरण हा महत्त्वाचा टप्पा असून,प्रशासनाकडून त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गावात जाऊन सेवा केंद्रांच्या कामकाजाची पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.


  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    ‘नशा मुक्त युवा – विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहातविद्यालय-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @२०४७’ या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेला साकार करण्यासाठी युवकांना व्यसनमुक्त, सुदृढ,सक्षम आणि राष्ट्राभिमानी बनविण्याच्या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारअंतर्गत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *