तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

Spread the love

धाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले.

राज्यपाल श्री.वर्मा यांचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनीही पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे स्वागत केले.

यानंतर जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी शासकीय विश्रामगृहात राज्यपालांचा शाल,श्रीफळ, कवड्याची माळ,पुस्तक तसेच श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.

या प्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ.प्रशांत नारनवरे,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अपर पोलीस अधीक्षक श्री.पांडकर,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय आडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.भंडे,तहसीलदार अरविंद बोळंगे,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक श्रीमती.माया माने यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *