शेतकऱ्यांचा अन्यायाविरुद्ध लढा – आ. कैलास पाटील यांचा ठाम पाठिंबा गुंडशाहीच्या विरोधात आवाज; पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी एकवटले

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर पवनचक्की प्रकल्प उभारणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला देण्यात आला असून, कोऱ्या कागदांवर त्यांच्या सह्या घेण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा विरोध करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

उपोषणाला पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावू लागली. या आंदोलनाची दखल घेत आमदार कैलास पाटील स्वतः आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली व त्यांच्या संघर्षाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

आंदोलनादरम्यान आमदार पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला जाब विचारला. “शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कंपन्यांची ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही,” असे ते म्हणाले. पोलिस यंत्रणा, बाऊन्सर आणि स्थानिक गुंड यांच्या मदतीने शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकारही या आंदोलनात उघड झाले.

संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनात आमदार पाटील स्वतः शेतकऱ्यांसोबत थांबले. शेवटी, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन दिले की, संबंधित पवनचक्की कंपन्यांवर कारवाई केली जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला दिला जाईल. त्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

“जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला प्रत्यक्षात मिळत नाही, तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार,” असा निर्धार आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत…

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *