शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अन्यथा तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन — मनसेचं प्रशासनाला इशारा

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी -: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून येत्या १५ ऑगस्ट रोजी तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात मनसेच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले असून यावेळी धाराशिव तालुका अध्यक्ष सलीमभाई औटी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडले असून शेतीवरील कर्जाचा बोजा दिवसेदिवस वाढत आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना १५ ऑगस्ट रोजी तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन करणार असून याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

मनसे ने दिलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (जिल्हा प्रशासन) काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक माहिती सादर करावी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील शेती क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनामार्फत अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची आखणी करण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *