भारताच्या अर्थकारणाला दिशा देणारा व देशाला जागतिक पातळीवर उंचीवर नेणारा नेता हरपला- डॉ.प्रतापसिंह पाटील

Spread the love

1990 ते 2010 या दोन दशकांमध्ये भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्री व पंतप्रधान असताना मोठी गती दिली.त्यासोबतच मनरेगा योजना,आधार कार्ड योजना,आरटीई ऍक्ट,शिक्षणाचा अधिकार कायदा,मंगलयान मिशन,चांद्रयान – १ अशा अनेक योजना व मोहिमा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राबवल्या

त्यातच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेली संपूर्ण कर्जमाफी हा निर्णय देखील त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणणारा होता या सर्व निर्णयामुळे डॉ.मनमोहन सिंग हे लाडके पंतप्रधान म्हणून शेतकऱ्यात ही लोकप्रिय झाले होते. अशा महान नेत्याचे 92 व्या वर्षी निधन झाले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिली आहे.

  • Related Posts

    बीएलओचे काम पाहणारे शिक्षक इंगळे यांचा अपघाती मृत्यू

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा‌.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे)…

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३० तासांची झुंज यशस्वी,तेरणा नदीत बुडालेल्या अमरचा मृतदेह अखेर सापडला; तेर गावावर शोककळा..

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी…. धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *