राज्यभरात २२ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, मुंबईत तीन नवे उपायुक्त

Spread the love

मुंबई : राज्यभरात पोलीस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश गुरूवारी जारी केले.
राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या तीन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. त्यात राकेश ओला, राजतिलक रोशन व समीर शेख या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाचे उपायुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग पोलीस येथे बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमनाथ घार्गे यांची पोलीस अधीक्षक (अहिल्या नगर), आंचल दलाल यांची पोलीस अधीक्षक (रायगड), महेंद्र पंडित यांची पोलीस उपायुक्त (ठाणे शहर), योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक (कोल्हापूर), बच्चन सिंह यांची समादेशक (राज्यराखीव पोलीस दल, नागपूर), अर्चिंत चांडक यांची पोलीस अधीक्षक (अकोला), बाळासाहेब पाटील यांची पोलीस अधीक्षक (नाशिक,ग्रामीण), यतीश देशमुख यांची पोलीस अधीक्षक (पालघर), सौरभ अगरवाल यांची पोलीस अधीक्षक (सीआयडी,पुणे, मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक (सिंधुदुर्ग), विश्व पानसरे यांची समादेशक (राज्य राखीव पोलीस दल, अमरावती, निलेश तांबे यांची पोलीस अधीक्षक (बुलढाणा), तुषार दोषी यांची पोलीस अधीक्षक (सातारा), सोमय मुंडे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ (छत्रपती संभाजीनगर), जयंत मीना यांची पोलीस अधीक्षक (लातूर), नितीन बगाटे यांची पोलीस अधीक्षक (रत्नागिरी) व रितु खोकर यांची पोलीस अधीक्षक (धाराशीव) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय संजय वाय. जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे. त्याच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *