राज्यभरात २२ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, मुंबईत तीन नवे उपायुक्त

Spread the love

मुंबई : राज्यभरात पोलीस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश गुरूवारी जारी केले.
राज्यात इतरत्र कार्यरत असलेल्या तीन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. त्यात राकेश ओला, राजतिलक रोशन व समीर शेख या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाचे उपायुक्त मंगेश शिंदे यांची नागपूर लोहमार्ग पोलीस येथे बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय सोमनाथ घार्गे यांची पोलीस अधीक्षक (अहिल्या नगर), आंचल दलाल यांची पोलीस अधीक्षक (रायगड), महेंद्र पंडित यांची पोलीस उपायुक्त (ठाणे शहर), योगेश गुप्ता पोलीस अधीक्षक (कोल्हापूर), बच्चन सिंह यांची समादेशक (राज्यराखीव पोलीस दल, नागपूर), अर्चिंत चांडक यांची पोलीस अधीक्षक (अकोला), बाळासाहेब पाटील यांची पोलीस अधीक्षक (नाशिक,ग्रामीण), यतीश देशमुख यांची पोलीस अधीक्षक (पालघर), सौरभ अगरवाल यांची पोलीस अधीक्षक (सीआयडी,पुणे, मोहन दहिकर यांची पोलीस अधीक्षक (सिंधुदुर्ग), विश्व पानसरे यांची समादेशक (राज्य राखीव पोलीस दल, अमरावती, निलेश तांबे यांची पोलीस अधीक्षक (बुलढाणा), तुषार दोषी यांची पोलीस अधीक्षक (सातारा), सोमय मुंडे यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ (छत्रपती संभाजीनगर), जयंत मीना यांची पोलीस अधीक्षक (लातूर), नितीन बगाटे यांची पोलीस अधीक्षक (रत्नागिरी) व रितु खोकर यांची पोलीस अधीक्षक (धाराशीव) येथे बदली करण्यात आली आहे. याशिवाय संजय वाय. जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे. त्याच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *