धाराशिवच्या नवीन बसस्थानकाची दुरवस्था! उद्घाटन झालं, पण प्रवाशांची तारांबळ सुरूच

Spread the love

धाराशिव  – शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेलं नवीन बसस्थानक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भव्य उद्घाटनाच्या थाटामाटानंतरही येथे आवश्यक ते काम अपूर्णच राहिल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत काँक्रिटीकरण होणे अत्यावश्यक होते, मात्र प्रत्यक्षात फक्त मुख्य कोनशीलेच्या ठिकाणीच काँक्रीट टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे उर्वरित भाग पूर्णतः मातीचा असून, पावसाळ्यात तो चिखलात परिवर्तित होतो. यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशांना चिखलातून वाट काढत बसपर्यंत पोहोचावं लागतं.

ही परिस्थिती पाहता प्रशासनाने केवळ औपचारिक उद्घाटन करून जबाबदारीतून पळ काढल्याचं चित्र जनतेसमोर आलं आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय, बस चालक-वाहकांचा होणारा त्रास आणि एकूणच सार्वजनिक सुविधांतील बेजबाबदारी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *