धाराशिवच्या नवीन बसस्थानकाची दुरवस्था! उद्घाटन झालं, पण प्रवाशांची तारांबळ सुरूच

Spread the love

धाराशिव  – शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेलं नवीन बसस्थानक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भव्य उद्घाटनाच्या थाटामाटानंतरही येथे आवश्यक ते काम अपूर्णच राहिल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत काँक्रिटीकरण होणे अत्यावश्यक होते, मात्र प्रत्यक्षात फक्त मुख्य कोनशीलेच्या ठिकाणीच काँक्रीट टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे उर्वरित भाग पूर्णतः मातीचा असून, पावसाळ्यात तो चिखलात परिवर्तित होतो. यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशांना चिखलातून वाट काढत बसपर्यंत पोहोचावं लागतं.

ही परिस्थिती पाहता प्रशासनाने केवळ औपचारिक उद्घाटन करून जबाबदारीतून पळ काढल्याचं चित्र जनतेसमोर आलं आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय, बस चालक-वाहकांचा होणारा त्रास आणि एकूणच सार्वजनिक सुविधांतील बेजबाबदारी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *