धाराशिवच्या नवीन बसस्थानकाची दुरवस्था! उद्घाटन झालं, पण प्रवाशांची तारांबळ सुरूच

Spread the love

धाराशिव  – शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेलं नवीन बसस्थानक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भव्य उद्घाटनाच्या थाटामाटानंतरही येथे आवश्यक ते काम अपूर्णच राहिल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत काँक्रिटीकरण होणे अत्यावश्यक होते, मात्र प्रत्यक्षात फक्त मुख्य कोनशीलेच्या ठिकाणीच काँक्रीट टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे उर्वरित भाग पूर्णतः मातीचा असून, पावसाळ्यात तो चिखलात परिवर्तित होतो. यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशांना चिखलातून वाट काढत बसपर्यंत पोहोचावं लागतं.

ही परिस्थिती पाहता प्रशासनाने केवळ औपचारिक उद्घाटन करून जबाबदारीतून पळ काढल्याचं चित्र जनतेसमोर आलं आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय, बस चालक-वाहकांचा होणारा त्रास आणि एकूणच सार्वजनिक सुविधांतील बेजबाबदारी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • Related Posts

    जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापुरात आता ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृह

    Spread the love

    Spread the loveतीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा धाराशिव  (प्रतिनिधी ) – तुळजापूरचा कायापालट होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची ४३८ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात…

    ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *