धाराशिवच्या नवीन बसस्थानकाची दुरवस्था! उद्घाटन झालं, पण प्रवाशांची तारांबळ सुरूच

Spread the love

धाराशिव  – शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेलं नवीन बसस्थानक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भव्य उद्घाटनाच्या थाटामाटानंतरही येथे आवश्यक ते काम अपूर्णच राहिल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मलगत काँक्रिटीकरण होणे अत्यावश्यक होते, मात्र प्रत्यक्षात फक्त मुख्य कोनशीलेच्या ठिकाणीच काँक्रीट टाकण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे उर्वरित भाग पूर्णतः मातीचा असून, पावसाळ्यात तो चिखलात परिवर्तित होतो. यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशांना चिखलातून वाट काढत बसपर्यंत पोहोचावं लागतं.

ही परिस्थिती पाहता प्रशासनाने केवळ औपचारिक उद्घाटन करून जबाबदारीतून पळ काढल्याचं चित्र जनतेसमोर आलं आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय, बस चालक-वाहकांचा होणारा त्रास आणि एकूणच सार्वजनिक सुविधांतील बेजबाबदारी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • Related Posts

    रेल्वेच्या विभागीय समितीच्या पुणे येथील बैठकीत धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या

    Spread the love

    Spread the loveपुणे  – रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभागाच्या विभागीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथे पार पडली. या बैठकीस रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री धरम वीर मीना, खासदार डॉ. सुप्रिया…

    विजेची वाढती गरज भागवण्यासाठी ‘पवन ऊर्जा'(Wind Energy) ठरणार गेमचेंजर

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला होतेय 5 गिगावॅट पवन ऊर्जा निर्मिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero Emission) करण्याचे लक्ष्य ठेवले असून 26…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *