श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे यशस्वी गळीत हंगामाची सांगता

Spread the love

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील श्री सिद्धिविनायक परिवार या संस्थेने २०२४-२५ या गळीत हंगामात १ लाख ५७ हजार मेट्रिक टन ऊसाचे यशस्वी गाळप करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संस्थेच्या माध्यमातून दोन ऊस कारखाने जिल्ह्यात यशस्वीरित्या कार्यरत आहेत.

ह्या हंगामाच्या सांगता समारंभाचे आयोजन संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. कार्यक्रमात बोलताना कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याची ग्वाही दिली आणि जानेवारी महिन्यापर्यंतच्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे सांगितले.

श्री सिद्धिविनायक परिवार नेहमीच शेतकरी हितासाठी प्रयत्नशील असतो आणि भविष्यातही अधिक चांगले काम करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे संस्थेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या कार्यक्रमात व्यंकटेश कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे, धनंजय गुंड, मंगेश कुलकर्णी, हेमंत कुलकर्णी, बालाजी जमाले, अभयसिंह शिंदे, प्रदीप धोंगडे यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार आणि वाहन मालक उपस्थित होते.

  • Related Posts

    रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०१ पाडोळी (आ.) येथे मिल रोलर पूजन उत्साहात; गाळप क्षमता २८०० टनांपर्यंत वाढ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी ) – रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. ०१, पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव येथे गाळप हंगाम २०२६–२७ निमित्त आयोजित मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात…

    धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *