धाराशिव सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या निधीचा प्रश्न मार्गी

Spread the love

मुख्यमंत्री फडणविस यांचे विशेष बाब म्हणून आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी देण्याचे निर्देश

धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर केले होते.परंतु त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने त्याचे काम रखडले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागासाठी मंजूर निधीमधून खास बाब म्हणून धाराशिवच्या रुग्णालयाला २७६.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याने जिल्ह्यातील जनतेला आता जवळपास १००० खाटांची सोय होणार असल्याची माहिती मित्र चे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

आशियाई विकास बँकेचा निधी हा वैद्यकीय शिक्षण विभागाला राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयात सुविधा निर्माण करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.त्याबैठकीत मुख्यमंत्री यांनी आपल्या विनंतीला मान देत याला अपवाद करत खास बाब म्हणून धाराशिव जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाला २७६.२५ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महायुती सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत व रुग्णालयासाठी नुकताच ४०४ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.लवकरच निविदा प्रक्रिया देखील केली जाणार आहे.त्यामुळे येत्या दोन वर्षात सर्व सोयीने युक्त सुसज्ज असे ४३० खाटांचे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने आता वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयाच्या ४३० खाटा , जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ५०० खाटा व स्त्री रुग्णालयाच्या ६० मिळून जवळपास १००० खाटा उपलब्ध होणार आहे.याचा फायदा सामान्य नागरिकांसह वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.याचा आधार घेत भविष्यात वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणाचे कोर्सेस सुरू करण्याचा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्‍यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले

    Spread the love

    Spread the loveराष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ३४ हजार कर्मचार्‍यांना दोन महिने पगार नाही! केंद्र सरकारने ८०० कोटी थकवले. मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात काम करणाऱ्या तब्बल ३४ हजार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन…

    आर. पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये स्पर्धापरीक्षा तयारीसाठी कार्यशाळा संपन्न!

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी धाराशिव येथील, आर. पी.औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयांमध्ये, संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंहजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील तसेच इतर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *