Spread the love

एनव्हीपी शुगरचा गुढी पाडव्यानिमित्त 100 रुपयांचा दुसरा हप्ता बँक खात्यात वर्ग

शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन ऊसबिल घ्यावे – चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील

धाराशिव – एनव्हीपी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याच्या वतीने सन 2024-25 च्या प्रथम गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन 100 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता गुढीपाडवा सणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

एनव्हीपी शुगर कारखान्याने प्रथम गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, तोडणी ठेकेदार, चालक, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने कमी कालावधीत 1 लाख 2 हजार मे.टन यशस्वी गाळप केले आहे. शेतकऱ्यांना ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांत प्रत्येक महिन्याच्या 1 व 16 तारखेला संबंधित शेतकर्‍याच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

  • Related Posts

    रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०१ पाडोळी (आ.) येथे मिल रोलर पूजन उत्साहात; गाळप क्षमता २८०० टनांपर्यंत वाढ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी ) – रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. ०१, पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव येथे गाळप हंगाम २०२६–२७ निमित्त आयोजित मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात…

    धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *