Spread the love

एनव्हीपी शुगरचा गुढी पाडव्यानिमित्त 100 रुपयांचा दुसरा हप्ता बँक खात्यात वर्ग

शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन ऊसबिल घ्यावे – चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील

धाराशिव – एनव्हीपी शुगर प्रा.लि.जागजी कारखान्याच्या वतीने सन 2024-25 च्या प्रथम गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन 100 रुपये प्रमाणे दुसरा हप्ता गुढीपाडवा सणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

एनव्हीपी शुगर कारखान्याने प्रथम गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, तोडणी ठेकेदार, चालक, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने कमी कालावधीत 1 लाख 2 हजार मे.टन यशस्वी गाळप केले आहे. शेतकऱ्यांना ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसांत प्रत्येक महिन्याच्या 1 व 16 तारखेला संबंधित शेतकर्‍याच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. तसेच ज्यांनी खाते दिले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे असे आवाहन चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.

  • Related Posts

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा सलग चार वर्षे अव्वल

    Spread the love

    Spread the love६२२ महिला उद्योजिकांची ऐतिहासिक भरारी धाराशिव दि.१५ एप्रिल (जिमाका) कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा केवळ शेतीवर आधारित नसून,त्या भागातील युवक-युवतींना मिळणाऱ्या उद्योग व रोजगार संधींवर अवलंबून असतो.हेच सूत्र…

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमजिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *