पंढरपूर-शेगाव रेल्वेमार्गास मंजुरीसाठी संसदेत आवाज उठवणार – खासदार ओमराजे निंबाळकर

Spread the love

भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले खासदारांना निवेदन

धाराशिव –  भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांची भेट घेऊन पंढरपूर-शेगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या कामांना गती मिळावी, निधीची तातडीने तरतूद करावी व लवकरात लवकर रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी निवेदन सादर केले.

या मार्गामुळे खामगाव, जालना, गेवराई, वाशी, भूम, परंडा, कुडुवाडी व पंढरपूरमार्गे कोल्हापूर ही शहरे थेट रेल्वे जाळ्यात समाविष्ट होतील. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व सामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

शिष्टमंडळाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पुढील मागण्या मांडल्या:

  1. प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या उर्वरित कामांना तातडीने मंजुरी मिळावी.
  2. केंद्र शासनाकडून आवश्यक निधीची त्वरित तरतूद करण्यात यावी.
  3. संसद अधिवेशनात हा विषय प्रभावीपणे मांडण्यात यावा.
  4. संबंधित लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक घेऊन पुढील संयुक्त पाठपुरावा करण्यात यावा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, “या विषयावर मी संसदेत ठामपणे आवाज उठवणार असून, लवकरच रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन निधी मंजुरीसाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय पाटील आरसोलीकर, काँग्रेस पक्षाचे विलास शाळू शिवसेना उबाठा पक्षाचे दिलीप शाळू शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.रामराजे साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप देशमुख, राजकीय कट्टाचे संपादक प्राचार्य सतीश मातने, दैनिक पुण्यनगरीचे भूम तालुका प्रतिनिधी प्रमोद कांबळे, दैनिक पुढारीचे अब्बास सय्यद,तानाजी सुपेकर,संतोष वराळे,आदिनाथ पालके,अलीम शेख,वसंत यादव, दिगंबर ढगे,अमृत भोरे, फैजान काजी, पांडुरंग धस, अ‍ॅड. रमेश काळे, अतुल शेळके, श्रीराम खंडागळे उपस्थित होते.
  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *