पोलीस प्राधिकरणाच्या माध्यमातून 8 वर्षात 6200 प्रकरणांचा निपटारा – उमाकांत मिटकरी यांची माहिती

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस प्राधिकरणाच्या मदतीने गेल्या 8 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 6200 प्रकरणांचा निपटारा केला.आणि पीडित लोकांसाठी काम केल्याचा आनंद आपल्याला होतोय अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी मिट द प्रेस कार्यक्रमातून दिली. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक आणि सरचिटणीस रवींद्र केसकर यांनी मिटकर यांचे स्वागत केले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मीट द प्रेस कार्यक्रमाची संकल्पना आणि भूमिका अध्यक्ष देवदास पाठक यांनी प्रास्ताविक करताना विशद केली.
पोलीस प्राधिकरणा संदर्भात बोलताना मिटकर म्हणाले, 2006 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यामध्ये पोलीस प्राधिकरण स्थापन करण्यात आले या माध्यमातून पीडित लोकांना न्याय देण्याचं काम अविरत सुरू आहे.
भटक्या समूहातील जमाती करिता मिटकर यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. पालावरची शाळा हा त्या उपक्रमाचा एक भाग होता. भटक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी,त्यांच्या उदार निर्वाह करिता, केलेले प्रयत्न आणि संघर्षमय भूतकाळाला मिटकरी यांनी उजाळा दिला, गेल्या 23 वर्षा मध्ये केवळ निस्वार्थी वृत्तीने,पीडित लोकांसाठी केलेल्या कामाचा जीवनपट उमाकांत मिटकर यांनी माध्यम प्रतिनिधी समोर मांडला.
पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण मध्ये चौकशी, पडताळणी नंतर न्यायिक आदेश देण्याचे काम होते. गेल्या आठ वर्षाच्या काळामध्ये 6200 प्रकरणांचा न्यायिक प्राधिकरणाने प्राधान्याने निफ्टारा केल्याचे मिटकर यांनी सांगितले. सध्या केवळ 89 प्रकरणे विविध कारणास्तव प्रलंबित आहेत. प्राधिकरणाकडे तक्रार झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांमध्ये प्रकरण निकाली काढले जाते त्यामुळे, ज्या कोणाला या संदभार्तील आपले घराणे तक्रारी द्यायचे आहेत अशा तक्रप्रदारांनी केवळ साधा अर्ज प्राधिकरणाकडे पाठवल्यास त्याच्यावर कार्यवाही होते. जनतेने प्राधिकरणाच्या लाभ घ्यावा असे आवाहन देखील मिटकर यांनी केले. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मिटकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमाला धाराशिव जिल्हा पत्रकार संघ,धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ, व्हॉइस आॅफ मीडिया संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र केसकर तर आभार गोविंदसिंह राजपूत यांनी मांडले.

  • Related Posts

    प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक – आरोपींवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा अक्कलकोट व सोलापूर बंदचा इशारा

    Spread the love

    Spread the loveसोलापूर  (प्रतिनिधी): अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा…

    खाजगी मोबाईल वर फोटो काढून गाड्यांवर चलन न करण्याचे आदेश

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *