पुरावा नसल्याने पाच जणांना मिळाली निर्दोष मुक्तता – जिल्हा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Spread the love

धाराशिव/ प्रतिनिधी -: जिल्ह्यातील शिवाजीनगर गावात चार वर्षांपूर्वी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात आज जिल्हा न्यायालायाने (वर्ग एक) मोठा निर्णय घेतला. पुरावा अपुरा असल्याने न्यायालयाने सर्व पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या निकालामुळे गावात आणि न्यायालयीन वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

26 जानेवारी 2020 रोजी घडली होती, गावातील एक महिला चंदा दाणे लिंब तोडायला शेतात गेली होती, आणि त्यावेळी फिर्यादी संदीप शिंदे यांच्या आईने तिला लिंब तोडण्यास मनाई केली. एवढ्या कारणावरून वाद सुरू झाला आणि त्याचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं, अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली होती.
आरोपींनी – बाळासाहेब शिंदे, सोमनाथ निंबाळकर आणि इतरांनी – त्यांना, त्यांच्या पत्नीला, आईला व दोन मामांना घरासमोर मारहाण केली. लाथा-बुक्क्या, काटे, आणि गंभीर इजा झाल्याचा आरोप होता. त्यामुळे भादंवि कलम 324, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला.

जेव्हा खटला चालू झाला, तेव्हा सरकारी वकिलांकडून सादर केलेले साक्षीपुरावे अपुरे पडले, तर चार जखमी साक्षीदारांची तपासणी झाली, पण पुरावा ‘सबळ’ नसल्याने जिल्हा न्यायाधीश वर्ग एक या कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं.

आरोपींच्या वतीने अॅड. निलेश दत्तात्रय बारखडे-पाटील यांनी अतिशय प्रभावी बाजू मांडली तर त्यांना अॅड. आनंद पाटील आणि अॅड. धनंजय मडके यांचे सहकार्य लाभले.

हा निकाल कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा असून यातून पुन्हा एकदा स्पष्ट होतं की न्यायालय ‘पुराव्यावर’ चालतं – भावना, गोंधळ किंवा तर्कावर नाही असे बोलले जात आहे.

  • Related Posts

    सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. ३० जुलै : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी…

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *