औद्योगिक क्षेत्रात सुविधा उपलब्ध करून दिल्यास उद्योग वाढीसोबतच रोजगार निर्मितीस मदतजिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Spread the love

जिल्हा उद्योग मित्र समिती सभा

धाराशिव – जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी सांगितले.

       १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या अडचणी सोडविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, व्यवस्थापक एम.डी.सूर्यवंशी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री.खाडे,महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.आडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण काळे व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी सांगितले की,जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातील.विशेषतः वडगाव सिद्धेश्वर,उमरगा, वाशी,सरमकुंडी,तामलवाडी,डिकसळ आणि कळंब या औद्योगिक क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा,वीजपुरवठा,पोलीस चौकी आणि प्रदूषण नियंत्रण यासारख्या सुविधांवर भर दिला जाईल.तसेच फटाके उद्योगासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तसेच लेदर क्लस्टर आणि सोलर प्रकल्प उभारण्याची मागणी समितीपुढे ठेवण्यात आली.औद्योगिक विकासामुळे जिल्ह्यात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील,असेही श्री.पुजार यांनी सांगितले.

तसेच,उद्योग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

  • Related Posts

    धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा सलग चार वर्षे अव्वल

    Spread the love

    Spread the love६२२ महिला उद्योजिकांची ऐतिहासिक भरारी धाराशिव दि.१५ एप्रिल (जिमाका) कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा केवळ शेतीवर आधारित नसून,त्या भागातील युवक-युवतींना मिळणाऱ्या उद्योग व रोजगार संधींवर अवलंबून असतो.हेच सूत्र…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *