अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर दणदणीत विजय…

Spread the love

टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करण्यास पाचारण केले. सामन्याच्या सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी अतिशय संयमाने टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव केवळ २६४ वर संपवला.

त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी धावफलक हलता ठेवत कांगारूंच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. विराट कोहलीची अफलातून अर्धशतकी खेळी आणि त्याला इतर सहकारी फलंदाजांनी दिलेली साजेशी साथ यामुळे टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत देदीप्यमान विजयाला गवसणी घातली.

भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्याकरता मनःपूर्वक शुभेच्छा.

  • Related Posts

    धाराशिव: तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी अकॅडमींची गर्दी, सर्वसामान्यांच्या व्यायामात अडथळा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – शहरातील नागरिकांसाठी व्यायामाचे एकमेव ठिकाण असलेल्या तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी क्रीडा अकॅडमींनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या…

    अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण, रिक्षा डायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरीचैतन्य, साहिल, सिध्दीची सुवर्णमय कामगिरी, मीनाक्षीला रौप्य

    Spread the love

    Spread the loveनवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *