अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर दणदणीत विजय…

Spread the love

टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करण्यास पाचारण केले. सामन्याच्या सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी अतिशय संयमाने टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव केवळ २६४ वर संपवला.

त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी धावफलक हलता ठेवत कांगारूंच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. विराट कोहलीची अफलातून अर्धशतकी खेळी आणि त्याला इतर सहकारी फलंदाजांनी दिलेली साजेशी साथ यामुळे टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत देदीप्यमान विजयाला गवसणी घातली.

भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्याकरता मनःपूर्वक शुभेच्छा.

  • Related Posts

    मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र२० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी अॅथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता…

    राज्य क्रीडा दिनानिमित्त,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : १५ जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दिवंगत ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *