मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची प्रगती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.

Spread the love

परंडा-मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची प्रगती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
ते श्रीकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ परंडा संचलित कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभात बोलत होते
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत म्हणून कल्याणसागर समुहाच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक,भाजपा धाराशिव जिल्हा सरचिटणीस श्री विकास कुलकर्णी हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते स्वयंशासन दिनाचे पदाधिकारी ऋषिकेश लांडगे,प्रणव वेताळ,सागर गाडे, अरसीन शेख, ईशल मुजावर, मयुरी कांबळे आस्था ठाकूर, आलीया शेख,इम्तियाज जिनेरी, भाग्यश्री घाडगे, प्रतिक्षा काकडे,अथर्व झाडबुके, रितेश अलबत्ते,ओंकार गायकवाड, संकेत केमदारने,शिवशंभो साळुंखे,रिझा शेख,सुहाना शेख यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र आठ विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. विद्यालयातील सर्व शिक्षक,सेवक यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किरण गरड सर यांनी केले तर सूत्रसंचालन मयुरी कांबळे व आर्या लांडगे यांनी व आभार वैष्णवी पाटील हिने मानले.

  • Related Posts

    राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला

    Spread the love

    Spread the loveराज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असताना अल्पसंख्यांक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला. या 75 संस्थांपैकी 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या आहेत. त्यांनाही 29 जानेवारी या…

    अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुले ; परदेशी उच्च शिक्षणासाठी ४० जणांना शिष्यवृत्ती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत “परदेशात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *