शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात समितीचे निवेदन

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रासह भारतातील बहुसंख्य राज्यांची निर्मिती ही भाषिक तत्त्वावर करण्यात आलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्राची रचना ही मराठी भाषेच्या भाषिक तत्त्वावर झालेली आहे. संपूर्ण मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या सह संपूर्ण महाराष्ट्र मराठी भाषेत बोलणारा प्रदेश असल्यामुळे महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर केवळ मराठी भाषेचा अधिकार आहे.शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणामध्ये भाषा विषय म्हणून हिंदी भाषेचा अनिवार्य विषय करण्यात आलेला आहे. हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा हा प्रकार आहे. संपूर्ण देशभरातील राज्यांची निर्मिती ही भाषीय तत्त्वावर झालेली असताना स्वतंत्र भारतामध्ये कोणत्याही राज्यांमध्ये भाषेची सक्ती करण्यात येणार नाही असे राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले आहे. तरी शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची करण्यात आलेली सक्ती तातडीने मागे घेण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनता व शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल याची शासनाने प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदन शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव जिल्हा, शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव शहर, शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव तालुका, शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिव यांचे वतीने मा. मामहीम राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव, तसेच मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद धाराशिव,व शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव ( माध्यमिक व उच्च माध्यमिक) आणि शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव (प्राथमिक) धाराशिव यांच्याद्वारे देण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव ची श्री धर्मराज सूर्यवंशी, अमोल पवार ,हनुमंत यादव, आकाश भोसले, संतोष घोरपडे ,हनुमंत तांबे ,बबलू भोईटे ,व्यंकटेश पडिले, ज्ञानेश्वर नलावडे ,अमोल साळुंके, भैरवनाथ रणखांब ,दत्तात्रय साळुंके ,नितीन वीर, योगेश अतकरे, प्रशांत नांदे ,बालाजी पवार ,सचिन खापरे, अक्षय घाडगे ,ज्योतीराम काळे ,अमोल गोरे ,तुषाल सूर्यवंशी, विश्वंभर आगळे, संजय शिंदे ,बालाजी खोचरे ,ज्ञानेश्वर मते, अॕडव्हेकेट अविनाश गरड ,ॲडव्होकेट ओंकार शितोळे यांचे सह समितीचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

    Spread the love

    Spread the loveधाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित…

    मनरेगा कर्मचाऱ्यांचे आंदोलन काळ्या फिती लावून केला निषेध

    Spread the love

    Spread the loveरत्नागिरी :- ‘एकच मिशन, शासन सेवेत समायोजन’ या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या राज्यव्यापी आंदोलनामध्ये काळ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *