ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन सहल

Spread the love

महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थानच्या दर्शनाचा योग – प्रशांत (बापू) साळुंके

धाराशिव – शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या आधारस्तंभ श्यामलताई साळुंके यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत (बापू) साळुंके यांनी दिली.

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. विशेषत: नवरात्र महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य हे मंडळ करत आहे. विशेष म्हणजे या नवरात्र महोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीत सर्व महिलांचा समावेश असतो. या महिलांना तीर्थक्षेत्र दर्शनाची संधी मिळावी यासाठी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, 11 मे रोजी पहाटे तीन वाजता ठाकरे नगर येथून ही तीर्थक्षेत्र दर्शन सहल मार्गस्थ होईल. या दर्शन सहलीकरिता दोन बसची व्यवस्था करण्यात आली असून मंडळातील एकुण 92 महिला यात सहभागी होणार आहेत. दोन दिवसांची ही दर्शन सहल असणार आहे.

या तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचा लाभ
ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या या दर्शन सहलीत तीर्थक्षेत्र आदमापूर येथील संत बाळू मामा देवस्थान, साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेली श्री महालक्ष्मी, क्ष्रीक्षेत्र ज्योतिबा, नृसिंहवाडी देवस्थानच्या दर्शनाचा लाभ महिलांना मिळणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत (बापू) साळुंके यांनी सांगितले.

  • Related Posts

    ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा; रुपामाता फाऊंडेशनचे सचिव अँड. अजित गुंड पाटील यांचीमागणी( पावसाळ्यापुर्वी वीज यंत्रणा मजबूत करण्याची मागणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील ढोकी व परिसरातील गावांमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, ढोकी येथील ३३ केव्ही सब-स्टेशनची क्षमता वाढवावी तसेच परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण…

    तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *