बार्शी कडकडीत बंद – स्व.संतोष भैया देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद, तहसीलवर मोर्चा

Spread the love

बार्शी – स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी तसेच धनंजय मुंढे यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी करत आज बार्शी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापारी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.

यावेळी निषेधार्थ बार्शी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी “संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे!” अशा जोरदार घोषणा दिल्या. आंदोलकांनी वाल्मीक कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.

बार्शी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागरिकांचा रोष पाहता प्रशासन सतर्क होते. अद्याप अधिकृत प्रतिसाद आलेला नसला तरी पुढील काळात या मागण्यांबाबत शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

    Spread the love

    Spread the loveधाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित…

    मनरेगा कर्मचाऱ्यांचे आंदोलन काळ्या फिती लावून केला निषेध

    Spread the love

    Spread the loveरत्नागिरी :- ‘एकच मिशन, शासन सेवेत समायोजन’ या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या राज्यव्यापी आंदोलनामध्ये काळ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *