“तू हे बंदुकीसाठी करतोयस!” — हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणप्रकरणात पोलिसांची टाळाटाळ; गुन्हा नोंदवण्यास नकार?

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरण व मारहाण प्रकरणात शहर पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आता खुद्द मडके यांनीच केला आहे.

या घटनेनंतर थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, पोलीस गुन्हा दाखल करण्याऐवजी उलटपक्षी विचारतात – “घटना घडली तेव्हा तुझे तीन बॉडीगार्ड कुठे होते?”

नेमकं काय घडलं?

२३ जुलै रोजी सायंकाळी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या नागेश मडके यांना चारचाकी गाडीतून आलेल्या ४-५ अज्ञातांनी सेल्फीच्या बहाण्याने गाडीत ओढून अपहरण केले. गाडीत बेदम मारहाण करून त्यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आणि वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून देण्यात आले.

“तू हे बंदुकीसाठी करतोस?”

मडके यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता एका अधिकाऱ्याने “तू हे सगळं बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी करतोस का?” असा संशयपूर्वक प्रश्न विचारून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.

पोलीस अधीक्षकांकडे धाव

या प्रकारामुळे मडके यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत असून, गुन्हा नोंद न होणे आणि अपहृत व्यक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गुन्हेगारीपेक्षा पोलिसांवरच संतापाचा भडका उडत आहे.

  • Related Posts

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    धाराशिव कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज दगडू जाधव यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव जिल्ह्यात युरिया खत वितरणातील कथित अनियमितता, फवारणी किट खरेदी-वितरण प्रक्रियेमधील गैरव्यवहार तसेच कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *