आषाढी वारीसाठी एसटी महामंडळाची विशेष तयारी; राज्यभरातून ५,२०० विशेष बसेस

Spread the love

पंढरपूर, ११ जून — आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी ५,२०० विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर येथे झालेल्या नियोजन बैठकीत दिली.

राज्याच्या कोणत्याही गावातून ४० किंवा अधिक भाविकांनी बसची एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरकडे जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

वारकऱ्यांसाठी विविध सवलती लागू
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी शासनाच्या विद्यमान सवलतीही लागू राहणार आहेत. त्यामध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास, तसेच महिलांसाठी ५० टक्के तिकिट सवलतीचा समावेश आहे.

तपासणी नाके आणि सुरक्षा व्यवस्था
वारीच्या काळात विनातिकीट प्रवास टाळण्यासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच २०० सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी २४ तास गस्त घालणार आहेत.

तात्पुरती बसस्थानके आणि जिल्हानिहाय नियोजन
वारीच्या गर्दीचे नियोजन लक्षात घेता पंढरपूरमध्ये चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत — चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) आणि विठ्ठल कारखाना.

चंद्रभागा बसस्थानक : मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा व पंढरपूर आगार

भिमा : छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती

विठ्ठल कारखाना : नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

पांडुरंग बसस्थानक : सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

प्रत्येक बस स्थानकावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, चौकशी कक्ष, संगणकीय आरक्षण केंद्र व मार्गदर्शक फलक यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.

चालक-वाहकांसाठी सुविधांची घोषणा
चालक व वाहकांसाठी निवास, जेवण व गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच बसेसची देखभाल-दुरुस्ती वेळेवर व्हावी यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन
वारीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३६ पेक्षा अधिक वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.

गतवर्षी ५,००० विशेष बसेसद्वारे २१ लाख भाविक प्रवाशांनी पंढरपूर यात्रा केली होती. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन अधिक व्यापक आणि कडक करण्यात आले आहे.

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *