परिवहन मंत्र्यांची एसटीच्या हॉटेल थांब्यांना अचानक भेट; अनधिकृत थांब्यांवर कडक कारवाईचे निर्देश

Spread the love

भिगवण  -: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट देत पाहणी केली. या दरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या अन्नपदार्थांची गुणवत्ता, दर, तसेच नाश्ता योजनेबाबत माहिती घेतली.

पाहणीदरम्यान महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवल्यानंतर, सरनाईक यांनी तात्काळ संबंधित हॉटेल मालकाला सुधारणा करण्याचे आदेश दिले. अन्यथा अशा थांब्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, या थांब्यांचे नियंत्रण पुणे विभागात असल्याने विभाग नियंत्रकांना देखील एका महिन्याच्या आत त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, भिगवणजवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बसेस थांबलेल्या असल्याचे सरनाईक यांच्या निदर्शनास आले. तेथे अस्वच्छ परिस्थितीत प्रवाशांना अन्न पुरवले जात असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, संबंधित चालक-वाहकांवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

याच दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी भिगवण बसस्थानकालाही भेट दिली. स्थानिक नागरिकांनी बसस्थानकाची अत्यंत खराब स्थिती, पावसाळ्यात होणारी पाण्याची अडचण आणि अस्वच्छ प्रसाधनगृहांची कैफियत मंत्री सरनाईक यांच्याकडे मांडली. त्यानंतर महामंडळाच्या बांधकाम विभागाशी संवाद साधत, नवीन भिगवण बसस्थानकाच्या कामासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले.

ही कारवाई केवळ अचानक भेटीपुरती मर्यादित न राहता, प्रवाशांच्या सुविधांसाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *