धाराशिव जिल्ह्यात ११ जून २०२५ पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यात आगामी सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध आंदोलने यांचा विचार करता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी लागू केली आहे. हा आदेश २९ मे २०२५ रोजी मध्यरात्री ००:०१ वाजेपासून ते ११ जून २०२५ रोजी २४:०० वाजेपर्यंत प्रभावी राहील.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार हा आदेश जारी करण्यात आला आहे. या काळात महाराणा प्रताप जयंती (२९ मे), राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती (३१ मे), शिवराज्याभिषेक सोहळा (६ व ७ जून), तसेच बकरी ईद (९ जून) हे सण व उत्सव पार पडणार आहेत. यामुळे शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, वक्फ कायद्याचा विरोध, शेतकरी आंदोलने, पिकविमा व नुकसानभरपाईबाबतच्या मागण्यांमुळे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी आदेश जारी करत पुढील गोष्टींवर बंदी घातली आहे – शस्त्र, सोटे, तलवार, बंदूक, लाठ्या, दगड किंवा इजा करणाऱ्या वस्तू जवळ बाळगणे, स्फोटके, दाहक पदार्थ वा फेकण्याजोगी साधने ठेवणे, आवेशी भाषणे, विडंबनात्मक कृती, संविधानविरोधी घोषणा, चित्रफलक, अशोभनीय वर्तन किंवा सामाजिक सलोखा बिघडवणारी कृती करणे, तसेच पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा जमाव, मोर्चा, मिरवणूक काढणे यास प्रतिबंध राहील.

जिल्ह्यातील सण, यात्रा, जत्रा व उरूस शांततेत पार पडावेत व संभाव्य आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • Related Posts

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    “माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून धाराशिवला निरोगी,सक्षम आणि आदर्श जिल्हा बनवूपालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन

    Spread the love

    Spread the loveआरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कार्यशाळा       १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य संस्थांचे ऑनलाईन लोकार्पण आणि ‘माझं गाव आरोग्य संपन्न…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *