तुळजापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

Spread the love

तुळजापूर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तुळजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

“जनतेने जनाधार दिला आहे घरी बसण्यासाठी. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आता घरी बसले पाहिजे,” असे वक्तव्य करत विखे पाटील यांनी सुळे यांना थेट लक्ष्य केले.

यावेळी त्यांनी सुळे यांच्या मागील कार्यकाळाचा उल्लेख करत म्हटले की, “त्यांनी वांग्याचे चांगले उत्पन्न घेतले होते, पण आता त्या वांगे-बटाट्याचे गणित त्यांनी राज्याला सांगावे.”

सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवरूनही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “सुळे यांनी फडणवीस यांच्यावर बोलण्याऐवजी स्वतःच्या कामाचा विचार करावा,” असे टोमणे त्यांनी लगावले.

विखे पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे सुळे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पुढील राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी दौरा – जिल्हा परिषद निवडणुक सभा घेणार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ…

    धाराशिवची लेक पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदीसुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *