तुळजापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

Spread the love

तुळजापूर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तुळजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

“जनतेने जनाधार दिला आहे घरी बसण्यासाठी. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आता घरी बसले पाहिजे,” असे वक्तव्य करत विखे पाटील यांनी सुळे यांना थेट लक्ष्य केले.

यावेळी त्यांनी सुळे यांच्या मागील कार्यकाळाचा उल्लेख करत म्हटले की, “त्यांनी वांग्याचे चांगले उत्पन्न घेतले होते, पण आता त्या वांगे-बटाट्याचे गणित त्यांनी राज्याला सांगावे.”

सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवरूनही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “सुळे यांनी फडणवीस यांच्यावर बोलण्याऐवजी स्वतःच्या कामाचा विचार करावा,” असे टोमणे त्यांनी लगावले.

विखे पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे सुळे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पुढील राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती खालावली; पुण्यात ICU मध्ये उपचार सुरू

    Spread the love

    Spread the loveपुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या तीव्र त्रासामुळे शनिवारी सायंकाळी त्यांना…

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा 59 वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *