तुळजापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

Spread the love

तुळजापूर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तुळजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली.

“जनतेने जनाधार दिला आहे घरी बसण्यासाठी. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आता घरी बसले पाहिजे,” असे वक्तव्य करत विखे पाटील यांनी सुळे यांना थेट लक्ष्य केले.

यावेळी त्यांनी सुळे यांच्या मागील कार्यकाळाचा उल्लेख करत म्हटले की, “त्यांनी वांग्याचे चांगले उत्पन्न घेतले होते, पण आता त्या वांगे-बटाट्याचे गणित त्यांनी राज्याला सांगावे.”

सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेवरूनही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “सुळे यांनी फडणवीस यांच्यावर बोलण्याऐवजी स्वतःच्या कामाचा विचार करावा,” असे टोमणे त्यांनी लगावले.

विखे पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे सुळे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पुढील राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत…

    विधानपरिषदेत नव्या चेहऱ्यांची एंट्री; १४ मे रोजी दहा सदस्यांचा शपथविधी सोहळा

    Spread the love

    Spread the loveमुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांसह पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एका सदस्याचा शपथविधी समारंभ गुरुवार, १४ मे २०२६ रोजी सकाळी ११…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *