दिनांक 16/02/026 रोजी हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर तसेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रकल्प होप आयोजित मैत्री मनाशी अभियान 2026….मानसिक आरोग्य वाढीस लागावे म्हणून 1 मे 2025 पासून हा प्रकल्प 28 गावामध्ये काम करत आहे . शारीरिक आरोग्य याबरोबर मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचे असून दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकालाच वेगवेगळ्या कारणास्तव तान तनाव चिंता आणि नैराश्य येत असते वेगवेगळ्या कारणास्तव लोक आत्महत्याचा विचार करतात. टोकाचे पाऊल उचलतात हा काही पर्याय नसून आपल्या मनातील दुःख आलेली समस्या यावर मात करण्यासाठी समुपदेशन घेणे तसेच मानसोपचार तज्ञ यांना भेटणे महिन्यातून तीन रविवार अणदूर येते मानसोपचार तज्ञ येतात त्यांनाही लोकांना भेटावे या ठिकाणी तपासणी फीस निशुल्क असून गरजेनुसार गोळ्या औषध लागले तर यामध्ये 50% बोलत आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हाच होता की जास्त प्रमाणात लोकांनी मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे यावरती dr. देशपांडे मॅडम यांनी माहिती दिली. या अभियानाचे उद्घाटन सलगर (म) येते दिनांक 8 फेब्रुवारी रोजी झाले होते.. समारोप दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी चिंचोली येथे करण्यात आला. यावेळी हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थाप्रमुख dr. शुभांगी अहंकारी मॅडम यांचे प्रमुख उपस्थिती होती, dr. संजोत देशपांडे ( पुणे) यांनी मानसिक आरोग्य आजार यावरती मार्गदर्शन केले. उपसरपंच किरण पाटील नावडे सर, प्रक्लप समन्वयक मेधा काळे मॅडम , वासंती मुळे, नागिनी सुरवसे , प्रकल्पाचे सतीश चव्हाण यांचे कडे सुपरवायझर म्हणून 11गावे आहेत. योगेश सोनवणे, ज्योती बिराजदार, चिंचोली गावातील मन मित्र सुषमा कदम , अशा कार्यकर्ते – कल्पना कदम झेपसखी – फतीमा पठाण ,अंगणवाडी कार्यकर्ते – समिना सय्यद , सीआरपी- शेशाबाई देडे ,तसेच 28 गावातून आलेले सर्व मन मित्र तसेच गावातील महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

  • Related Posts

    विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित…

    शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात,न्या.शैलेश ब्रम्हे

    Spread the love

    Spread the loveविधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा धाराशिव – विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *