स्वातंत्र्यानंतर प्रथमच! मरकणार ते अहेरी – दुर्गम गडचिरोलीत बससेवेची ऐतिहासिक सुरुवात

Spread the love

नक्षलग्रस्त भागात विकासाचा नवा मार्ग, दळणवळणासोबत विश्वासही

गडचिरोली – स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ‘मरकणार’ ते ‘अहेरी’ मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नाही, तर विकास, संवाद आणि विश्वासाचा सेतू ठरणार आहे.

या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने घेतलेली मेहनत, तसेच स्थानिक जनतेचे सहकार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे, असे मत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे “नक्षलमुक्त भारत” दिशेने उचललेले एक ठोस पाऊल असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

या सेवेचा शुभारंभ हा केवळ वाहतूक सेवा सुरू करणे नाही, तर विस्थापित आणि दुर्लक्षित भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. आता या भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या संधी मिळणार आहेत.


  • Related Posts

    जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दिनांक १० जून रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय धाराशिव व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था,छत्रपती संभाजीनगर,यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक धाराशिव डॉ.धनंजय चाकुरकर,निवासी वैद्यकीय बाह्य…

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *