स्वातंत्र्यानंतर प्रथमच! मरकणार ते अहेरी – दुर्गम गडचिरोलीत बससेवेची ऐतिहासिक सुरुवात

Spread the love

नक्षलग्रस्त भागात विकासाचा नवा मार्ग, दळणवळणासोबत विश्वासही

गडचिरोली – स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ‘मरकणार’ ते ‘अहेरी’ मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नाही, तर विकास, संवाद आणि विश्वासाचा सेतू ठरणार आहे.

या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने घेतलेली मेहनत, तसेच स्थानिक जनतेचे सहकार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे, असे मत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे “नक्षलमुक्त भारत” दिशेने उचललेले एक ठोस पाऊल असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

या सेवेचा शुभारंभ हा केवळ वाहतूक सेवा सुरू करणे नाही, तर विस्थापित आणि दुर्लक्षित भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. आता या भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या संधी मिळणार आहेत.


  • Related Posts

    शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveपुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुणे  – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण…

    सोलापूर रेल्वे विभागातील ३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांचा गौरव

    Spread the love

    Spread the loveसोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर्स क्लब ऑडिटोरियम हॉल, सोलापूर येथे ७० वा रेल्वे आठवडा २०२५ कार्यक्रम आयोजित केला होता. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *