स्वातंत्र्यानंतर प्रथमच! मरकणार ते अहेरी – दुर्गम गडचिरोलीत बससेवेची ऐतिहासिक सुरुवात

Spread the love

नक्षलग्रस्त भागात विकासाचा नवा मार्ग, दळणवळणासोबत विश्वासही

गडचिरोली – स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ‘मरकणार’ ते ‘अहेरी’ मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नाही, तर विकास, संवाद आणि विश्वासाचा सेतू ठरणार आहे.

या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने घेतलेली मेहनत, तसेच स्थानिक जनतेचे सहकार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे, असे मत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे “नक्षलमुक्त भारत” दिशेने उचललेले एक ठोस पाऊल असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

या सेवेचा शुभारंभ हा केवळ वाहतूक सेवा सुरू करणे नाही, तर विस्थापित आणि दुर्लक्षित भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. आता या भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या संधी मिळणार आहेत.


  • Related Posts

    तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि…

    नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *