स्वातंत्र्यानंतर प्रथमच! मरकणार ते अहेरी – दुर्गम गडचिरोलीत बससेवेची ऐतिहासिक सुरुवात

Spread the love

नक्षलग्रस्त भागात विकासाचा नवा मार्ग, दळणवळणासोबत विश्वासही

गडचिरोली – स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ‘मरकणार’ ते ‘अहेरी’ मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नाही, तर विकास, संवाद आणि विश्वासाचा सेतू ठरणार आहे.

या उपक्रमासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाने घेतलेली मेहनत, तसेच स्थानिक जनतेचे सहकार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे, असे मत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे “नक्षलमुक्त भारत” दिशेने उचललेले एक ठोस पाऊल असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.

या सेवेचा शुभारंभ हा केवळ वाहतूक सेवा सुरू करणे नाही, तर विस्थापित आणि दुर्लक्षित भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. आता या भागातील विद्यार्थी, नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक चांगल्या संधी मिळणार आहेत.


  • Related Posts

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  (प्रतिनिधी) -: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, सकाळी ११:४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जनता…

    युवकांसाठी सुवर्णसंधी! खादी मंडळाच्या योजनांनी गावातच मिळवा रोजगार.

    Spread the love

    Spread the loveतुमच्याकडे पारंपरिक कौशल्य आहे? गावात उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे? मग सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या या योजना तुमच्यासाठीच आहेत.या योजनांतून विनातारण कर्ज, टूलकिट, प्रशिक्षण आणि लाखोंचे अनुदान…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *