छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अतिक्रमण मुक्त व परिसर स्वच्छता यासाठी समितीचे निवेदन

Spread the love

धाराशिव – शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्यावतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील बरेच अनधिकृत अतिक्रमण वाढलेले आहे.फळांचे गाडे,खाद्यपदार्थाचे स्टॉल, प्रवासी रिक्षा वाहने व कचरा टाकण्यामुळे या परिसरात अस्वच्छता दुर्गंधी व वाहतुकीची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे.याच परिसरात वर्दळीच्या गर्दीमुळे मद्यप्राशन केलेले काही लोक लघुशंका व घाण करण्याच्या घटना सतत घडत आहेत.याच परिसरात बहुसंख्य डिजिटल बोर्ड लावले जातात. यामुळे पुतळा परिसराचे सौंदर्य नाहीसे होत आहे. शिवरायांच्या पुतळ्याचा बहुतांशी भाग साफसफाई विना राहत आहे. या सर्व घटकांमुळे समस्त धाराशिवकर शिवभक्तांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत.या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी व साफसफाईसाठी 24 तास नगर परिषदेचे दोन कर्मचारी नियुक्त करावे,पुतळा परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे,पुतळा परिसराचे रुंदीकरण करण्यात यावे, पुतळा परिसरात डिजिटल बोर्ड लावण्यास बंदी घालण्यात यावी, पुतळ्याच्या पावित्र्यासाठी व संरक्षणासाठी आपल्या शासकीय स्तरावरून पोलीस विभागाशी पत्रव्यवहार करून 24 तास पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी.शिवछत्रपतींचा पुतळा व परिसरात काही अघटीत दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदन मा.मुख्याधिकारी मॅडम नगरपरिषद धाराशिव यांना देण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमंत यादव, सचिव श्री आकाश भोसले, शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे, श्री हनुमंत तांबे, श्री व्यंकटेश पडिले, श्री अमोल साळुंके,श्री रामानंद माडेकर, विशाल पवार, बालाजी क्षीरसागर, श्री योगेश आतकरे,अॕड.श्री जयप्रकाश साळुंके इ. सह समितीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

    Spread the love

    Spread the loveधाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित…

    तुळजापूर येथे भरदिवसा मारहाण व गोळीबार; गुंडांवर कठोर कारवाईची मागणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध धाराशिव | प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी भरदिवसा घडलेल्या गंभीर मारहाण व…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *