जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करावेत

Spread the love

परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

धाराशिव – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत , आपल्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच २५ एप्रिल रोजी होणारे सर्व कार्यक्रम (रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर वगळता) रद्द करण्यात यावेत , असे आवाहन परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, ” हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अतिशय कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. यादृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमित शहा स्वतः लक्ष घालत असून त्यांना त्यात यश मिळेल. या घटनेत पर्यटकांना मारताना ते मुसलमान नाहीत, याची खात्री करून मारण्यात आले आहे. ही अतिशय संतापजनक बाब असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो “.
ते पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व कार्यकर्त्यांनी श्रीनगर येथे अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्या दुःखा मध्ये आपण सर्व सामील असून या कुटुंबावर ओढावलेल्या दुःखद प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी त्यांना धैर्य द्यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *