दलित वस्तीचा निधी दलित वस्तीतच खर्च करा‌ॲड.गोरक्ष लोखंडे

Spread the love

धाराशिव नगर परिषदेचा आढावा

धाराशिव – दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळणारा निधी हा केवळ दलित वस्तीतच खर्च होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी.असे निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी दिले.

आज ३ फेब्रुवारी रोजी शिंगोली विश्रामगृह धाराशिव येथे नगर परिषद धाराशिवच्या दलित वस्तीच्या विकासकामांच्या खर्चाबाबत,लाड पागे समिती व अनुकंपा नियुक्तीबाबत आढावा घेतांना आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत व धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.लोखंडे म्हणाले,दलित वस्त्यांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत का याचा आढावा यावेळी घेण्यात आला.काही ठिकाणी अद्याप पाणीपुरवठा, स्वच्छता,रस्ते,गटार यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याचे भेटीदरम्यान निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आयोगाचे दलित वस्ती सुधार योजनेसाठी मिळणाऱ्या निधीच्या वापराबाबत विशेष लक्ष असल्याचे सांगून श्री.लोखंडे म्हणाले,काही भागांमध्ये हा निधी इतर कामांसाठी वापरण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.हा निधी मूळ उद्देशानुसार केवळ दलित वस्तीतच वापरण्यात यावा,असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले.

निधीचा योग्य वापर करण्यात येत आहे.मात्र, काही ठिकाणी मंजुरी प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचे श्रीमती फड यांनी सांगितले.

आयोगाच्या सदस्यांनी या समस्या गांभीर्याने घेतल्या आणि येत्या काही महिन्यांत पुन्हा दौरा करून कामांची पाहणी केली जाईल,असे सांगितले. तसेच,नगर परिषदेला दलित वस्त्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *