४ फेब्रुवारीपासून कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

Spread the love

धाराशिव – ०४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ०४ फेब्रुवारी २०२५ हा दिवस”United by Unique “या थीमवर आधारित आहे.

या दिनाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती श्री.एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार उपमुख्यमंत्री,श्री. प्रकाश आबिटकर,सार्वजनिक आरोग्य मंत्री,श्रीमती मेघना बोर्डीकर – साकोरे,राज्यमंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे.जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व आरोग्य संस्थांनी आपल्या संस्थांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे
४ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जिल्ह्यातील आतापर्यंत निदान झालेल्या सर्व कर्करोग रुग्णांना संदर्भ सेवा व विनामूल्य औषध उपचार मिळण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

९ फेब्रुवारी रोजी कर्करोग निदान वाहनांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथज शिंदे,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर – साकोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

९ ते १६ फेब्रुवारीदरम्यान उपजिल्हा, स्त्री रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम व संशयित रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.१७ ते २४ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील संशयित सर्व कर्करोग रुग्णांना आवश्यक ते पुढील तपासणी आणि निदानासाठी आपल्या जवळच्या उपजिल्हा / ग्रामीण / स्त्री रुग्णालय येथे संदर्भित करून आवश्यक ते औषधोपचार देण्यात येणार आहे.२५ फेब्रुवारी रोजी संशयित रुग्णांपैकी ज्या रुग्णांचे कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांना जवळच्या कर्करोग उपचार केंद्रावर संदर्भित करून त्यांना उपचाराखाली घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव सभागृह येथे करण्यात येणार आहे.

तरी ही मोहिम महाराष्ट्रभर ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये थेट प्रसारित केली जाणार आहे.४ फेब्रुवारी २०२५ पासून संपूर्ण राज्यभर जनजागृती आणि कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.या उपक्रमात आरोग्य संस्था,सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. तसेच या कर्करोग तपासणी शिबाराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *