अणदूर येथे कॅनल दुरुस्तीचे निकृष्ट काम; पाण्याची गळती होण्याची शक्यता

Spread the love

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील बाळूबाई साठवण तलाव ते फुलवाडीकडे जाणाऱ्या कॅनलच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. केवळ मुरूम टाकून दुरुस्ती सुरू असल्याने पाण्याची गळती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लवकरच उन्हाळा सुरू होणार असताना ही दुर्दशा ग्रामस्थांसाठी अडचणीची ठरणार आहे. या कामामुळे चिवरी पाटी आणि वत्सला नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाझरणार असल्याचा आरोप केला जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ आर्थिक लूट सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, या कॅनलमधून वाहणारे पाणी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या शेतीसाठी उपयोगी पडणार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत अधिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

  • Related Posts

    धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५…

    येरमाळा – श्री माता येडेश्वरी चैत्र यात्रा चुन्याच्या रानातील भाविक भक्तांची गर्दी

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *