अणदूर येथे कॅनल दुरुस्तीचे निकृष्ट काम; पाण्याची गळती होण्याची शक्यता

Spread the love

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील बाळूबाई साठवण तलाव ते फुलवाडीकडे जाणाऱ्या कॅनलच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. केवळ मुरूम टाकून दुरुस्ती सुरू असल्याने पाण्याची गळती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लवकरच उन्हाळा सुरू होणार असताना ही दुर्दशा ग्रामस्थांसाठी अडचणीची ठरणार आहे. या कामामुळे चिवरी पाटी आणि वत्सला नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाझरणार असल्याचा आरोप केला जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ आर्थिक लूट सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, या कॅनलमधून वाहणारे पाणी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या शेतीसाठी उपयोगी पडणार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत अधिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

  • Related Posts

    ‘हरित धाराशिव’ची जय्यत तयारी ; सामाजिक वनीकरण विभागाकडून ३५ लाखांहून अधिक रोपांची निर्मितीजिल्हाधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १५ जूनपासून शासकीय दरात रोपे उपलब्ध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव अभियान २०२६’ ची तयारी अंतिम टप्प्यात…

    व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनांच्या रांगाच रांगा , महामार्गावर अपघात झाल्यास कोण जबाबदार

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : शहरा नजीक असलेल्या समाधान हॉटेल जवळील महानगर गॅस पंप यांच्या मिसाळ नियोजनाचा फटका बाहेरगावच्या भाविकांना बसण्याची शक्यता असून भाविकांच्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *