अणदूर येथे कॅनल दुरुस्तीचे निकृष्ट काम; पाण्याची गळती होण्याची शक्यता

Spread the love

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील बाळूबाई साठवण तलाव ते फुलवाडीकडे जाणाऱ्या कॅनलच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. केवळ मुरूम टाकून दुरुस्ती सुरू असल्याने पाण्याची गळती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लवकरच उन्हाळा सुरू होणार असताना ही दुर्दशा ग्रामस्थांसाठी अडचणीची ठरणार आहे. या कामामुळे चिवरी पाटी आणि वत्सला नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाझरणार असल्याचा आरोप केला जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ आर्थिक लूट सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, या कॅनलमधून वाहणारे पाणी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या शेतीसाठी उपयोगी पडणार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत अधिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

  • Related Posts

    जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापुरात आता ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृह

    Spread the love

    Spread the loveतीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा धाराशिव  (प्रतिनिधी ) – तुळजापूरचा कायापालट होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची ४३८ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात…

    ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *