सोलापूर /बार्शी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीतील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात आनंद काशीद म्हणाले, “आजच्या काळात महिलांनी आणि मुलींनी सक्षम व निर्भय होणे अत्यंत आवश्यक आहे. जिजाऊ मा साहेबांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने संकटांवर मात करण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. जिजाऊंसारख्या स्त्रियांच्या आदर्शांवर चालल्यास कोणत्याही अडचणींवर मात करणे शक्य आहे. महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे.”
या जिजाऊ पूजनाच्या वेळी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पांडुरंग घोलप, विक्रम बापू घाईतिडक, रणजीत पाटील, मनोज शिंदे, गणेश भोसले, राजवीर काशीद, रणवीर काशीद यांच्यासह अनेक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाने एकता, प्रेरणा, आणि जिजाऊंच्या विचारांचा प्रसार यांना महत्त्व दिले.