राज्यातील १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंढे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी

Spread the love

मुंबई : राज्य शासनाने आज मोठा प्रशासकीय फेरबदल करत १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे.
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांची गेल्या २१ वर्षांत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. सध्या ते दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य या महत्त्वाच्या विभागांच्या सचिवपदी करण्यात आली आहे.
दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना मुंढे यांनी अनेक ठोस आणि धाडसी निर्णय घेतले. विभागातील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम राबवली. विशेषतः बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस आणत संबंधितांवर कारवाई करून त्यांनी प्रशासनात शिस्त प्रस्थापित केली.
ऑगस्ट २००५ मध्ये प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून सोलापूर येथे सेवेला सुरुवात केलेल्या मुंढे यांनी देगलूर, नागपूर, वाशिम, कल्याण, मुंबई अशा विविध ठिकाणी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, सीईओ तसेच विविध विभागांमध्ये वरिष्ठ पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या नेमणुका पुढीलप्रमाणे:
२००५ : प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
२००७ : उपजिल्हाधिकारी, देगलूर
२००८ : सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
२००९ : आयुक्त, आदिवासी विभाग
२००९ : सीईओ, वाशिम
२०१० : सीईओ, कल्याण
२०१८ : सहसचिव, नियोजन
२०१८ : प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
२०२० : आयुक्त, नागपूर महापालिका
२०२० : सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
२०२१ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
२०२२ : आयुक्त, आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
२०२३ : सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास
२०२३ : सचिव, मराठी भाषा विभाग
३१ मार्च २०२६ रोजी त्यांच्या नवीन बदली आदेशानुसार दिव्यांग कल्याण विभागातून त्यांची महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या हा प्रशासनात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. तरीही प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाच्या धडाक्याने वेगळी छाप सोडली आहे.

  • Related Posts

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत…

    अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

    Spread the love

    Spread the loveसांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा सांगली – : “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री व वापर होणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *