अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

Spread the love

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

सांगली – : “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री व वापर होणार नाही व भावी पिढीचे यापासून संरक्षण होईल, यासाठी अमली पदार्थ विरोधी समितीच्या सर्व शासकीय सदस्यांनी जबाबदारीने व गांभीर्याने कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा सचित्र अहवाल सादर करावा. तसेच, हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी तपासणी मोहीम व व्यापक जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या. जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अमली पदार्थ प्रतिबंधक कार्यवाही, उपाययोजना व जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, अमली पदार्थ विरोधी अभियानामध्ये पोलीस पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक यांनाही सहभागी करून घ्यावे. ग्रामसभेमध्ये याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. कृषि विभागाने क्षेत्र तपासणी, एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने चालू व बंद कारखाने तपासणी मोहीम, रेल्वेचे डबे व वाहनांवर अमली पदार्थ विरोधी जनजागृती स्टिकर्स लावणे, शाळा-महाविद्यालयांची तपासणी करणे आदिंच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा सचित्र व सविस्तर माहितीचा अहवाल सादर करावा. कामगारांमध्ये जनजागृती करावी. कोणत्याही ठिकाणी असे पदार्थ आढळले तर त्याबाबतही व्यापक प्रसिद्धी करावी. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शाळांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले यावेळी अमली पदार्थ अनुषंगाने कृषि, उपप्रादेशिक परिवहन, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदि विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती सादर केली.

  • Related Posts

    ८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर…

    गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’

    Spread the love

    Spread the loveमहाराष्ट्र शासनाने राबवलेला ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे. प्रशासकीय कामाची पुनर्रचना, संपूर्ण डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *