८.२९ लाखांच्या विक्रीसह नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

Spread the love

धाराशिव – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे आयोजित “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” चा उत्साहात समारोप आज झाला.या महोत्सवाचे उद्घाटन २७ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.

या जिल्हास्तरीय प्रदर्शनात धाराशिव जिल्ह्यातील स्वयंसहाय्य महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे एकूण ४२ स्टॉल्स उभारण्यात आले होते.यामध्ये ज्यूस,उसाचा रस,लिंबू सरबत, गावरान तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत, धान्य,कडधान्य,राजमा,कडक भाकरी,शेंगांची चटणी,दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड,कुरडई,शेवया, मनुके,हस्तकला व शोभेच्या वस्तू, मूर्ती,फ्लॉवर पॉट,रेडीमेड कपडे तसेच विविध खाद्यपदार्थांचा समावेश होता.या तिन्ही दिवसांत स्टॉलधारकांची एकूण सुमारे ८ लाख २९ हजार रुपयांची विक्री झाली असून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महोत्सवाच्या समारोप प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर,सहायक पोलीस निरीक्षक श्री.दिनेश जाधव, संरक्षण अधिकारी श्री.भुजंग भोसले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री.सुखदेव चिंचोलीकर,तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.अध्यक्षा श्रीमती.निर्मला उबाळे,श्रीमती.स्मिता पाटील,श्रीमती.सुरेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनात सहभागी सर्व स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते “नवतेजस्विनी महोत्सव २०२६” सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी माविम जिल्हा कार्यालय तसेच तालुका स्तरीय सी.एम.आर.सी.यांनी विशेष प्रयत्न केले.धाराशिवकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. सुखदेव चिंचोलीकर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.


  • Related Posts

    जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – सद्यस्थितीत भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दि.१२ मार्च २०२६ रोजीच्या आदेशान्वये राज्यासाठी ३७४४ किलो लिटर केरोसिन नियतन मंजूर केले आहे.त्यानुषंगाने राज्य शासनाकडून धाराशिव…

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्कतुळजापूर,उमरगा व लोहारा तालुक्यातील सात प्रकल्पांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानाची शक्यता आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.तुळजापूर,उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सात पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *