पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्ग,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न

Spread the love

धाराशिव -: जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते, तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

मृदा व जलसंधारण विभाग, धाराशिव व मृदा व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपूर्णतः अभियान २.० अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून श्री.पुजार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जल योद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, धाराशिव सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गोडसे व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती वैशाली घुगे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार पुढे म्हणाले की, पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने आपल्या स्तरावर नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. पूर्वी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत होते, मात्र आज ‘हर घर जल’ योजनेमुळे अनेक गावांमध्ये घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. ही सकारात्मक बदलाची दिशा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे श्री.पुजार म्हणाले.

जिल्ह्यात दर तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे धरणे, कालवे, बंधारे यांसारख्या प्रकल्पांबरोबरच स्थानिक स्तरावर पाणी साठवणूक आणि पुनर्भरणावर भर देणे आवश्यक आहे, असे सांगून श्री.पुजार म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या घराजवळ सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे तयार केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. ‘जलयुक्त शिवार’ योजनेसह विविध शासकीय योजनांद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत.

  • Related Posts

    प्रगणक-पर्यवेक्षकांची भूमिका निर्णायक ; जनगणना अचूकतेने पार पाडा ,निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – भारताची जनगणना २०२७ ही डिजिटल पद्धतीने होणारी असून ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत…

    क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमातून संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना

    Spread the love

    Spread the loveजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धां धाराशिव – क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना,शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो.दैनंदिन कामकाजातील ताणतणावातून मुक्तता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *