स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांवर तोडगा; हफ्त्यांमध्ये बिल भरण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी मान्य

Spread the love

धाराशिव  : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणेमधील त्रुटींमुळे अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले येऊन वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाढीव वीजबिलांची दुरुस्ती करून नागरिकांना बिलाची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आहे.

आमदार पाटील यांनी सांगितले की, सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असताना अनेक ठिकाणी वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित होत असून जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात जुने मीटर व्यवस्थित कार्यरत असतानाही नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून त्यानंतर बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत.

नोव्हेंबर महिन्यात ७०० रुपये आणि डिसेंबरमध्ये सुमारे ८०० रुपये येणारे वीजबिल जानेवारी महिन्यात थेट १५ हजार रुपयांच्या घरात गेल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या बिलांमध्ये दुरुस्ती करावी तसेच नागरिकांना दिलासा देण्यासाठी हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत हप्त्यांमध्ये बिल भरण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. मात्र वीजबिल भरणे आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच वीजदर कमी करण्यात आले असून स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांना बिलावर १० टक्के सवलत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

  • Related Posts

    गेट टुगेदर ..बालमैत्रीच्या आठवणींना उजाळा, विश्वासाच्या नात्यांचा सुंदर मेळावा , सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, निरागस आणि अविस्मरणीय काळ. इयत्ता पहिली ते दहावी, तसेच अकरावी-बारावी आणि पुढील शिक्षणाच्या प्रवासात लाभलेले वर्गमित्र, मैत्रिणी व सहकारी…

    आपत्ती व्यवस्थापनाला नवी ताकद : पूर,आग आणि बचावकार्यासाठी अत्याधुनिक वाहनेपालकमंत्र्यांनी केले लोकार्पण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तींचा वाढता धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव अंतर्गत खरेदी करण्यात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *