कला केंद्रात बारी पाहण्यासाठी गेला,परतताना जीव गमावून बसला

Spread the love

धाराशिव – (प्रतिनिधी ) चोराखळी ता. कळंब येथील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मयताचे वडील भागवत मुंडे यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सतीश मुंडे (वय 37) रा.साळेगाव ता.केज जि.बीड असं मयत तरुणाचं नाव असून घटनेच्या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेला होता. मित्रांनी दारू पाजून बारी पाहण्यासाठी नेले आणि बारी पाहून परत जाताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारल्याचा आरोप कुटुंबांनी केला आहे. शेख अजमुद्दिन ,शेख रौफ ,संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे यांनी लाथा बुक्क्यांनी सतीश मुंडे यांच्या पोटावर आणि छातीवर मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे
गेल्यावर्षीच गोळीबाराच्या घटनेने आणि एका युवकाच्या खुण प्रकरणामुळे हे महाकाली कला केंद्र चर्चेत आलं होतं.त्यामुळे जिल्ह्यातील इतर कला केंद्रावर तपासणी करून नियमाचा बडगा दाखवत सर्व कला केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे,परंतु महाकाली कला केंद्राविषयीच प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असून असल्याने ते कलाकेंद्र सुरू आहे. अशा या कला केंद्रामुळे परिसरातील नागरिकांची व गावाची मात्र हकनाक बदनामी मात्र मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या चर्चा नागरिकांतून एकावयात येत आहेत. त्यामुळे या कलाकेंद्राविषयी लवकरात लवकर निर्णय लागावा याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ व वास्तव्य असलेल्या चोराखळी गावाची मात्र मोठ्या प्रमाणावर बदनाम होत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक ही अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहेत.

  • Related Posts

    कळंब पोलिसांची धडक कारवाई; कन्हेरवाडी शिवारात १५ लाखांचा अफू जप्त ?

    Spread the love

    Spread the loveकळंब (प्रतिनिधी) -: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. कन्हेरवाडी ते मांडवा जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतातून पोलिसांनी तब्बल १०० किलो अफूची झाडे…

    धाराशिव महावितरणमध्ये ३० हजारांची लाच; तिघा कर्मचाऱ्यांना ACB ने रंगेहाथ पकडले

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – महावितरण कंपनीत इच्छित ठिकाणी बदली आणि पदस्थापना देण्याच्या निमित्ताने लाच घेणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *