दहावी-बारावीनंतर करिअरची योग्य दिशा : तुळजापूर येथे मानसशास्त्रीय कलचाचणी व समुपदेशन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

Spread the love

धाराशिव – दहावी व बारावीनंतर योग्य करिअरची निवड कशी करावी, मानसशास्त्रीय चाचण्यांच्या आधारे भविष्यातील करिअरविषयक निर्णय कसे घ्यावेत,या उद्देशाने श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,तुळजापूर येथे १६ जानेवारी २०२६ रोजी मानसशास्त्रीय कलचाचणी व करिअर समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जागतिकस्तरावर वापरली जाणारी इंटरेस्ट प्रोफाईलर JP ही मानसशास्त्रीय कलचाचणी घेण्यात आली.

या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतातील एकूण ५२ प्रमुख करिअर क्षेत्रांमधील उपलब्ध असलेल्या शेकडो जॉब रोल्सपैकी आपल्या आवडीनिवडी,क्षमता व कौशल्यांशी सुसंगत जॉब रोल निवडण्यास मदत होणार आहे.ही चाचणी जागतिक स्तरावर कार्यस्थळावरील मूल्ये (वर्किंग व्हॅल्यूज) ओळखण्यासाठी वापरली जाते.या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू,कार्यमूल्ये तसेच त्यानुसार योग्य करिअर पथ निवडण्याबाबत स्पष्टता मिळाली.

या मानसशास्त्रीय कलचाचणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-ओळख निर्माण होऊन भविष्यातील करिअरविषयक निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनातून घेण्यास मदत झाली.श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे ८९ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रम व रोजगार मंत्रालयाचे समुपदेशक श्री.दत्तात्रय सुभाष कांबळे,मॉडेल करिअर सेंटर,लातूर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे,सहाय्यक आयुक्त श्री.संजय गुरव तसेच श्री.दत्ता चव्हाण (परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी सहाय्यक आयुक्त,धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

या उपक्रमासाठी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री.वैजनाथ घोडके,शिक्षकवृंद व कर्मचारी तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, धाराशिव येथील श्री.बाबासाहेब शेटे व श्रीमती विद्या नाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  • Related Posts

    धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५…

    येरमाळा – श्री माता येडेश्वरी चैत्र यात्रा चुन्याच्या रानातील भाविक भक्तांची गर्दी

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *