मुंबई : – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर सुरू असलेल्या सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
अधिवेशन ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
विधानभवन सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होईल, अशी अधिकृत माहिती संबंधित अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रातून मिळाली आहे.
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ठेकेदारांच्या कामकाजातील अडचणींमुळे “यंदा सत्र मुंबईतच होणार” अशी चर्चा होती.
त्यातच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “सत्रात आठ-दहा दिवसांचा विलंब होऊ शकतो” अशी सूचनात्मक टिप्पणी करून गोंधळ वाढवला होता.
मात्र, विधानभवन सचिवालयाने कैलाश पाझारे आणि स्नेहलता खोब्रागडे या कक्ष अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट निर्देश दिले आहेत की —
“सत्र ८ डिसेंबरलाच सुरू होणार असून, सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी.”
सचिवालयाचे साहित्य २६ नोव्हेंबरपासून नागपुरात पोहोचण्यास सुरुवात, तर अधिकारी आणि कर्मचारी २७ नोव्हेंबरपर्यंत नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे ठळक मुद्दे :
८ ते १९ डिसेंबर २०२५ : हिवाळी अधिवेशनाचा कालावधी
१० दिवसांचे प्रत्यक्ष कामकाज नियोजित
पहिल्याच दिवशी पूरक मागण्या सादर होणार
१० डिसेंबरला चर्चा व मतदान होईल
सत्र वाढवण्याची शक्यता नाही