धाराशिव जिल्ह्यातील बँकांमध्ये ३१ कोटींच्या ठेवी बेवारस; परत मिळवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम

Spread the love

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये तब्बल १ लाख ४३ हजार ९६९ खातेदारांच्या ३१ कोटी रुपयांच्या ठेवी दावा न केल्यामुळे पडून आहेत. या हक्काच्या ठेवी मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने एक विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. चिन्मय दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँक (जिल्हा अग्रणी बँक) आणि जिल्ह्यातील इतर सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने ही मोहीम १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वैयक्तिक, संस्थात्मक आणि विविध सरकारी योजनांशी संबंधित खात्यांमधील दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्याची सुवर्णसंधी खातेदारांना मिळणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, जे बँक खाते सलग १० वर्षे निष्क्रिय असते, त्यामधील रक्कम ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’ (DEAF) मध्ये जमा केली जाते. मात्र, असे असले तरी खातेदारांचा आपल्या पैशांवरील कायदेशीर हक्क कायम राहतो आणि ते कधीही ही रक्कम परत मिळवू शकतात.

आपल्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. तिथे आवश्यक कागदपत्रे आणि अद्ययावत केवायसी (KYC) जमा केल्यानंतर त्यांना त्यांची रक्कम परत मिळेल. या मोहिमेदरम्यान सर्व बँका जनजागृती शिबिरे आणि ग्राहक भेटींसारखे कार्यक्रम आयोजित करणार असून, जिल्ह्यातील सर्व पात्र खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. दास यांनी केले आहे.

  • Related Posts

    भारतीय स्टेट बँक, आरबीओ धाराशिव येथे ‘अन्नदाता उत्सव’ अंतर्गत प्रगतशिल शेतकरी व कृषी उद्योजक ग्राहक मेळावा संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : भारतीय स्टेट बँक, आरबीओ धाराशिव यांच्या वतीने ‘अन्नदाता उत्सव’ उपक्रमांतर्गत आज धाराशिव येथे प्रगतशिल शेतकरी व कृषी उद्योजक ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या…

    “तुमची ठेव,तुमचा अधिकार” – जिल्ह्यात दावा न केलेल्या ठेवींच्या वितरणासाठी मेळावा

    Spread the love

    Spread the love धाराशिव – जिल्हा अग्रणी बँक,धाराशिवने विविध बँकाच्या माध्यमातून बँकेत दावा न केलेल्या ३१ कोटी ठेवी १ लाख ३१ हजार खातेदारांना परत मिळवण्याकरता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *