नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love

धाराशिव – मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. 388) यांच्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे 00 हे 40 आर मोठे नुकसान झाले आहे. तसेच चन्नाप्पा वट्टे यांचे (गट नं. 819) टोमॅटो पिकाचे 00 हे 20 आर क्षेत्रावरील मान्सुनपुर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीची तुळजापुर तहसिलचे तहसिलदार अरविंद बोळंगे, तलाठी पाटील मॅडम, कृषी सहाय्यक कापसे यांच्या उपस्थितीत पहाणी करुन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करणेबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी चेतन बंडगर, दिपक भिसे, कार्तीक वाघमारे, कालीदास खताळ, श्रीराम मोगरकर यांच्यासह स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच परीसरातील शेतकरी व नागरीक यांची उपस्थिती होती.

  • Related Posts

    लातूरातील ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी

    Spread the love

    Spread the loveशेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने…

    धाराशिवमध्ये वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात आढावा बैठक — आ. कैलास पाटील यांचे प्रशासनाला सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – धाराशिव शहरातील वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील जमीनधारकांच्या मागण्या, अडचणी आणि शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *