तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

Spread the love

आधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ

धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा आज तुळजापूर येथे उत्साहात शुभारंभ झाला.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.२४ व २५ फेब्रुवारीदरम्यान सैनिक विद्यालय मैदान,नळदुर्ग रोड,तुळजापूर येथे हा महोत्सव पार पडत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या महामेळाव्यात सहभागी व्हावे,असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

हवामान बदल,वाढता उत्पादन खर्च आणि बदलती बाजारपेठ या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.आधुनिक शेती तंत्रज्ञान,पीक व्यवस्थापन,सेंद्रिय शेती,प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेतील संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,टाटा इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. बाळ राक्षसे,उपजिल्हाधिकारी श्री. सागर नन्नावरे,तहसीलदार श्री.बोलंगे आत्माचे प्रकल्प संचालक श्री. मिसाळ,उपविभागीय कृषी अधिकारी श्री.महादेव आसलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब देशमुख,तालुका कृषी अधिकारी तुळजापूर यांनी केले.

महोत्सवात एकूण ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यात शासकीय,निमशासकीय विभाग, महिला बचत गट तसेच विविध संस्थांचा सहभाग आहे.३० शासकीय दालनांमधून कृषी, महसूल,पशुसंवर्धन,जलसंधारण तसेच महिला व बालकल्याण विभागांच्या योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.ड्रोन तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे.सोयाबीन,हरभरा,ऊस,रेशीम आणि आंबा यांसारख्या पिकांच्या लागवडीपासून प्रक्रिया व निर्यातीपर्यंत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे.‘उत्पादक ते ग्राहक’ या संकल्पनेतून थेट विक्री दालनांमुळे शेतकऱ्यांना मध्यस्थांशिवाय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी महोत्सव परिसराची पाहणी करून विविध स्टॉल्सना भेट दिली .

  • Related Posts

    कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत…

    प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक माहिती सादर करावी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील शेती क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनामार्फत अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची आखणी करण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *