दत्ताभाऊ कुलकर्णी यांची सलगरा (दि)वारकरी संप्रदायास सदिच्छा भेट – अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

Spread the love

सलगरा (ता. तुळजापूर) – सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी सलगरा गावात आयोजित करण्यात आलेल्या वारकरी कीर्तन कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी विशेष उपस्थिती लावून वारकरी परंपरेला सन्मान दिला. या कार्यक्रमात त्यांनी अध्यात्मिकतेचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

या कीर्तन सोहळ्याचे आयोजन ज्ञानेश्वर बोधणे यांनी केले होते, तर कीर्तनकार म्हणून संदीपान महाराज हासेगावकर यांची कीर्तनसेवा लाभली. गावातील अनेक वारकरी मंडळी, महिलावर्ग व युवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संपूर्ण वातावरण हरिनामाच्या गजराने भारावून गेले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे पारंपरिक वारकरी पद्धतीने फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान स्वीकारताना त्यांनी वारकरी संप्रदायातील साधेपणा, भक्ती, शिस्त आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे कौतुक केले.

यावेळी कुलकर्णी म्हणाले, “वारकरी संप्रदाय म्हणजे केवळ धार्मिक चळवळ नाही, तर ही एक सामाजिक एकतेची आणि मूल्यनिष्ठ जीवनशैलीची प्रेरणा आहे. आजच्या युगात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि अध्यात्माची जपणूक अत्यंत आवश्यक आहे. गावागावातील अशा कीर्तन-भजनाच्या परंपरा टिकून राहिल्या पाहिजेत.”

कीर्तनानंतर झालेल्या संवाद सत्रात त्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेतले व शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी ग्रामीण स्तरावर संस्कृती संवर्धनासोबतच विकासाची गती वाढवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहनही केले.

दत्ताभाऊ कुलकर्णी यांची ही सदिच्छा भेट गावकऱ्यांसाठी उत्साहवर्धक ठरली असून, त्यांच्याद्वारे वारकरी संप्रदायास मिळालेला सन्मान ही सामाजिक सलोख्याची जपणूक करणारी बाब ठरली असल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले.

  • Related Posts

    श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव भक्तीभावात संपन्नहजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

    Spread the love

    Spread the loveश्रीशैल गवंडी, दि. ०२/०२/२६ (अक्कलकोट) — येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे…

    ‘हिंद-दी-चादर’ ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्तजिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांचा उत्साहपूर्ण समारोप

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहाद्दूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या त्यागशील जीवनकार्याचा,तत्त्वज्ञानाचा व सामाजिक योगदानाचा प्रसार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *